Friday, August 3, 2007

पुन्हा एकदा व्यक्तिपूजा


गुरुवारी रात्री साडेदहाची वेळ... पुण्यातील येरवडा तुरुंगाबाहेर अनेक तरुणतुर्कांची गर्दी... परिसरात राहणाऱ्या आणि आपल्या आवडत्या नायकाच्या दर्शनासाठी जमलेल्या असंख्य तरुण-तरुणींना रोखण्यासाठी पोलिसांनी चांगलीच कंबर कसलेली... काही वेळातच पोलिसांच्या गाड्यांचा ताफा येतो... त्यातीलच एका गाडीत न्यायालयानं गुन्हेगार ठरवलेला एक अभिनेता बसलेला असतो... काही वेळातच गाडीत बसलेला "तो' खाली उतरतो... तुरुंगाच्या छोट्या प्रवेशद्वारातून आत जाण्याआधी चाहत्यांना हात उंचावून अभिवादन करतो... हे सगळं "थेट' आपल्या श्रोत्यांपर्यंत पोचविण्यासाठी अनेक कॅमेरे "लाईव्ह' असतात...

एखाद्या चित्रपटाला शोभेल असाच हा प्रसंग. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी "मुन्नाभाई' संजय दत्तला विशेष "टाडा' न्यायालयानं सहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर सुरू झाली खरी स्टोरी! अगदी खच्चून "मसाला' भरलेल्या चित्रपटासारखीच. संजय दत्तनं आर्थर रोड तुरुंगात असताना जेवण केलं का नाही, त्यानं तिथं रात्र कशी काढली, तो कधी झोपला आणि कधी उठला, त्याला भेटण्यासाठी कोण कोण आलं, अशा अनेकविध प्रश्‍नांची उत्तरं वाचकांनी किंवा प्रेक्षकांनी मागितलेली नसताना सुद्धा काही माध्यमांनी ती देणं आपलं "कर्तव्य' आहे, असं समजत देऊन टाकली. माध्यमांनी बजावलेल्या "कर्तव्या'चा योग्य तो परिणाम झालाच. "मुन्नाभाई'च्या चाहत्यांनी आर्थर रोड आणि येरवडा तुरुंगाबाहेर केलेली गर्दी हा त्याचाच परिणाम.

राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केलेले "मुन्नाभाई एम.बी.बी.एस.' आणि "लगे रहो मुन्नाभाई' हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले नसते तर मात्र संजय दत्तला आजच्या इतके चाहते नक्कीच लाभले नसते. माझ्या मते, संजूबाबाला हिरो बनविण्याच्या हेतूनेच "मुन्नाभाई एम.बी.बी.एस' प्रदर्शित करण्यात आला आणि तो साध्यही झाला. "लगे रहो मुन्नाभाई'चे कथानक मात्र वेगळं होतं. या चित्रपटामागं विचार होता. तंत्रज्ञानातील क्रांतीनं व्यापलेल्या सध्याच्या 21व्या शतकामध्येही महात्मा गांधीजींचे विचार उपयुक्त आहेत. हे सांगण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला. "मुन्नाभाई एम.बी.बी.एस.'मुळे संजय दत्त आणि अर्षद वारसी या दोघांभोवती निर्माण झालेलं वलय या चित्रपटामुळं अधिकच गडद झालं. प्रेक्षक सोयीस्करपणे चित्रपटातील विचार विसरून गेले. मात्र, लक्षात राहिला तो संजूबाबा. इथूनच त्याच्याविषयीच्या व्यक्तिपूजेला सुरूवात झाली. तशी व्यक्तिपूजा भारतीयांना नवी नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर असो किंवा महात्मा ज्योतिबा फुले. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे असो किंवा आणखी कुणी. आम्हाला त्या व्यक्तिच्या विचारांशी काही देणं घेणं नाही. आम्ही मानतो ते फक्त त्या व्यक्तिला. मग त्यांची जयंती असो किंवा पुण्यतिथी. एका मंडपात "त्या' व्यक्तिचा फोटो ठेवून वरून हार घालायचा. संध्याकाळी भलीमोठाली मिरवणूक काढायची आणि पुन्हा वर्षभर तो फोटो कुठंतरी अडगळीत ठेवून द्यायचा. झाला आमचा कार्यभाग संपला. संजय दत्तला पाहण्यासाठी जमलेले चाहते, याच व्यक्तिपूजेच्या आहारी गेलेले. संजय दत्तला शिक्षा सुनावताना न्यायालयानं त्याच्यावर ओढलेले ताशेरे सोयीस्करपणे विसरले जातात. संजय दत्तनं केवळ स्वतः गुन्हा केलेला नसून, इतरांनाही गुन्हा करण्यास प्रवृत्त केलंय. पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केलाय, हे सगळं कोण बघतंय. आम्हाला आपला संजूबाबाच प्रिय.

या सगळ्याला प्रसिद्धी देताना आपण इतरांपेक्षा वेगळं काय देऊ शकतो, हे सतत पाहणारी माध्यमं आपण नक्की काय देत आहोत, याकडं मात्र कानाडोळा करतात. प्रत्येक घटना "लाईव्ह' करण्याची खरंच गरज आहे का? अशा घटना "लाईव्ह' करण्यापेक्षा समाजात इतरही बरंच काही घडत आहे. ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोचविण्याची गरज आहे. हे कधी लक्षात घेणार. प्रत्येक बातमीमध्ये काहीतरी "मसाला' असलाच पाहिजे का? या सगळ्याचा विचार करण्याची हीच खरी वेळ आहे. आपल्याकडं चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्या ही सध्याच्या स्थितीत खूप प्रभावी माध्यमं आहेत. तुम्ही या माध्यमातून जे काही द्याल ते शेवटच्या माणसापर्यंत झिरपत. प्रेक्षकांना पर्यायानं जनतेला प्रभावित करण्याचं कामही हे माध्यम करू शकतं. फक्त तुम्ही प्रेक्षकांपर्यंत जे पोचवत आहात त्याच आकलन त्यांना योग्य पद्धतीनं होईल, याची काळजी घेण्याची गरज आहे.

न्यायालयाच्या लेखी संजय दत्त गुन्हेगार आहे. भारतीय कायद्याप्रमाणे त्याला शिक्षाही झाली आहे. आता ही शिक्षा तो येरवड्यातील तुरुंगात भोगेल किंवा आणखी कुठल्या तुरुंगात, तो फक्त सुरक्षेचा आणि प्रशासकीय भाग आहे. शिक्षा संपेपर्यंत तरी इतर कैद्यांप्रमाणे संजय दत्तही एक कैदी आहे. इतरांप्रमाणे त्यालाही तुरुंगात काम करावं लागेल. या सगळ्याच्या विरोधात त्याचे वकील यथायोग्य न्यायालयीन लढाई लढतीलच. फक्त आपण एक नागरिक म्हणून यामध्ये कितपत वाहत जायच, ते आपल्यालाच ठरवायला लागेल. संजय दत्तला लाखो चाहते आहेत म्हणून भारतातील काय जगातील कोणतंही न्यायालय त्याला माफ करणार नाही, हे लक्षात ठेवलेलं बरं, नाहीतर पुढं आपणच वेड्यात निघू आणि त्याला जबाबदारही आपणच असू.

6 comments:

A woman from India said...

Hi,
Welcome to the world of blogging.
I am glad that professional journalists like you are now blogging in marathi. There are many amature writers and poet, but for some reason Marathi writers and journalists are late in catching up with this technology and space.
I wanted to comment on the photographs in your blog. The compositions are refreshingly pleasant. Are you the photographer your self? I like how the actor is framed with the metal detector. I also liked the close up of news paper.
Hope to read more on this blog.

HAREKRISHNAJI said...

किती चपखल व योग्य लिहीले आहेत. हे कोणीतरी लिहिण्याची गरज होती. प्रसिद्धीमाधमांनी तर तारतंत्रच सोडले आहे. सारा पैशाचा खेळ.आपण कशाचे उदात्तीकरण करतो आहे याचे ही त्यांना भान नाही.

आता त्याच्याबद्द्ल सहानभुती मिळवण्यासाठी लेख लिहीणे, अश्याच गुन्हातील ईतरजण दोषी असताना ही कसे मोकळे सुटले हे सांगणॆ वगैरे चालु होईल.

यात सर्वात वाईट गोष्ट म्हणजे प्रमाणॆ राजकीय नेते ही त्याची भलावण करु लागले आहेत.

हा चित्रपट व ही भुमिका हे सुद्धा त्याचे एक चांगला भला माणुस म्हणुन लोकांपुढे प्रतिमा निर्माण करणॆ याच उद्देशाने काढला असावा.

भुमीका व खरे आयुष्य आतली सीमारेषा फार कमी जणांनाच कळली.

प्राची said...

I am totally agree with you.
Munnabhai M.B.B.S. was made just to glorify sanjay's image, that's all. Even if I like him as an actor, i think he has got the right justice for his deeds.
And what more to write about our electronic media? They have got one more sensetion... Let some days pass away, then see. They know very well,public memory is how strong. I just wish that the supreme court won't forgive him.He has to pay....
Anyway, I'm happy to read a balanced article. Keep the spirit.
Keep faith in you, your Penpower.

Ravi Karandeekar said...

Hello Vishwanath, What a pleasant surprise! I didn't know that there is/are blogs in Marathi. Great! Congrats and thanks. By the way, you didn't like the film "Munnabhai?" It is not there in your profile. I liked both. I like Sanjay Dutta. He is true super star of Hindi film. Look, no one has entertained us as him. On the screen and off the screen. Look at him as an entertainment. Now a days every thing is entertainment. Even you blog. I enjoyed it. Thanks!

Prasad said...

..tv channels have nothing to do with seriousness of news...they just have 2 deal with the profit..so u can not expect from the media so much

Anonymous said...

Prasidhi Madhyame Murkha ahte. Electronic Media tar Kapadech kadhayala basala ahe. Kuthe hi kahihi faltu ghatana ghadli ki yancha live suru hota. Mag Sanjay Dutta chya shikshenantar tyanchya kadun ankhi kai aapeksha karnar?

Sanjay Dutta motha deshbhakta nahi. Security sathi AK 47 thevnara deshadrohi ahe.Tyala CHAPLENE marun fodun kadhla pahije. 6 nahi 10 varsha shiksha zali pahije....Haramkhor, Dalbhadri, Deshadrohi...sanjubaba la bhar Chowkat chabkana Phodun kadhla pahije.

Ashish Chandorkar